Breking News
मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडेसमाज कल्याण कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार‘बारामती’मध्ये सुनेत्रा अजित पवार यांना शिवसंग्रामचा पाठिंबा : डॉ. ज्योती मेटेकोथरूडमध्ये महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीचा उत्साहअनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेपुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचा ‘फोटो फेअर’ उत्साहात संपन्नवडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत – खासदार मेधा कुलकर्णीवाढदिवशी फुलं नको, ई-कचरा द्या- आमदार हेमंत रासनेमहात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष आग्रह धरणार

कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाले – डॉ. नीलम गोऱ्हे

कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाले - डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे घेतले दर्शन

marathinews24.com

कोणार्क (ओडिशा)- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सध्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या इतिहास, शिल्पकला व सांस्कृतिक वारशाबाबत कौतुक केले. कोणार्क मंदिरातील हजारो शिल्प, प्रभात सूर्याचे अप्रतिम चित्रण, हत्तींची सुमारे दोन हजार शिल्पे आणि महिलांच्या, सामान्य जनतेच्या तसेच राज घराण्यांच्या जीवनाशी संबंधित शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचे अनमोल वैभव आहे.”

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले , १९०१ साली ब्रिटिशांच्या लक्षात आलेले हे मंदिर तेव्हा ‘पॅगोडा’ म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याचे खरे स्वरूप समोर आले. १९८४ मध्ये भारत सरकारने या मंदिराचा संपूर्ण कारभार पुरातत्त्व विभागाकडे सोपविला. महाराष्ट्रातुन मराठा राजे ओरिसात आले तेंव्हा मंदिराची मोठ्या प्रमाणात भग्नावस्था झाल्याचे पाहुन कोणार्क मंदिरातील ‘अरुण स्तंभ’ त्यांनी जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरात हलविला होता असेही तेथील गाईडने आम्हाला सांगितले.

“आपल्या पूर्वजांनी केलेल्या या कर्तृत्वाचा अभ्यास इथल्या लोकांनी उत्तम रीतीने जपून ठेवला आहे. तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच आज आपण जे कार्य करत आहोत, त्याचा इतिहासात काय ठसा उमटणार आहे, याचाही विचार इथे आल्यावर मनात जागृत होतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी भारत सरकारच्या जी-२० परिषदेच्या वेळी या मंदिराचा घेतलेला संदर्भ व त्यातून परराष्ट्र संबंध दृढ करण्याच्या झालेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×