Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

पूरग्रस्तांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट धावली; दिला १ कोटींचा निधी

पूरग्रस्तांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट धावली; दिला १ कोटींचा निधी

‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द 

marathinews24.com

पुणे – मानव सेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तर, सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला हा मदतीचा हात देण्यात आला.

पुरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान धावले; मुख्यमंत्री सहायता निधीला दिली ५१ हजारांची मदत – सविस्तर बातमी 

मुंबईत धनादेश सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह कार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, तुकाराम रासने उपस्थित होते.

ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून कोयना, लातूर भूकंप सारख्या आपत्तीच्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत यांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वेळोवेळी मदत देत ट्रस्टने संवेदना दाखविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×