Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे

सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे

४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप

marathinews24.com

पुणे – भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप २२ ऑगस्टला सायंकाळी झाला. महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ,पर्वती) येथे झालेल्या अधिवेशनात देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते. दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे ची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – सविस्तर बातमी 

देशातील १२ संस्थांचा अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग होता. ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी केले.२२ ऑगस्टला अधिवेशनाचा दुसरा दिवस विविध ज्योतिष विषयक सत्रांनी गाजला.या सत्राचे उद्घाटन डॉ. सुनीता पागे, डॉ.सीमा देशमुख, मोहन दाते, सिद्धेश्वर मारटकर, मोहन फडके, शुभंगिनी पांगारकर, मधुसूदन घाणेकर, शशिकांत ओक, नितीन गोठी, चारुशीला कांबळे, सोपान बुडबाडकर आणि जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत झाले.या दिवशी कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.जयश्री बेलसरे यांना,सौ. पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार तर चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्री नाटेकर हे अध्यक्षस्थानी होते. आयोजक चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पा शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.

नाटेकर म्हणाले,’ ज्योतिष हे उपयुक्त माध्यम असून त्यातून सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे. समाजाला समृद्ध करण्यासाठी ज्योतिषांनी कार्यरत राहावे. ज्योतिषांनी आधुनिक माध्यमे वापरावीत, त्यातून प्रभाव निर्माण करावा. अधिवेशनातील विषयात वैविध्य आणले पाहिजे. ४३ वर्षे हे अधिवेशन होत आहे. ही अतुलनीय गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान भरभराट यावी, यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुण हुपरीकर आणि डॉ. नीलेश कुलकर्णी होतेपहिल्या दिवशी २१ ऑगस्ट रोजी उदघाटन सोहळा उल्हास पाटकर, विजय जकातदार, अविनाश मग्गीरवार, राज कुंवर, नवनीत मानधनी, चंद्रकला जोशी, रोहित वर्मा, नवीनभाई शहा, व.दा.भट, उमेश कुलकर्णी, कैलास केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उल्हास पाटकर यांचा अमृतमहोत्सव निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार आणि रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आले. गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योतिषविषयक पुस्तकांचे प्रकाशनही झाले. गौरी केंजळे आणि अर्चना जोगदेव यांनी सूत्रसंचालन केले

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×