Breking News
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणबिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रयगांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआडआपुलकी कर्करोग रूग्णालयाचा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटकखडकवासल्यात ‘हिट अँड रन’ मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

“समाजात बहीण-भावाच्या नात्याची खरी जाणीव निर्माण झाली, तर महिला सुरक्षित वातावरणात वावरतील” – ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी

“समाजात बहीण-भावाच्या नात्याची खरी जाणीव निर्माण झाली, तर महिला सुरक्षित वातावरणात वावरतील” – ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी

ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 700 हून अधिक पेंटर बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे; नशामुक्तीचे घेतले वचन

marathinews24.com

पुणे – रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये ‘माझी बहीण’ पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे. समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅंडल मार्च काढण्याची वेळच येणार नाही, असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपोडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केले. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने तिरुपती गार्डन, विश्रांतवाडी येथे ७०० हून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी प्रत्येक बांधवाला राखी बांधून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

या विशेष कार्यक्रमात ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांच्यासह बेन्झर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल, उद्योजक अनिल अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते. ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी म्हणाल्या, “आजचा समाज मानसिक तणावाने ग्रासलेला आहे. अशा वेळी राजयोग ध्यानाच्या माध्यमातून मनःशांती, स्थैर्य आणि आत्मबल मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. आमची संस्था कोणत्याही जात, धर्म, वय किंवा सामाजिक स्तर न पाहता सर्वांसाठी कार्यरत आहे.”

अनिल अग्रवाल यांनी सांगितले, “व्यवसाय हे केवळ नफा मिळवण्याचे साधन नसून, सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे एक प्रभावी माध्यमही आहे. रक्षाबंधनासारखे पारंपरिक सण अध्यात्माशी जोडून साजरे करून कामगारांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे हाच आमचा या उपक्रमाचा उद्देश आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×