Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जैन दीक्षा म्हणजे धैर्याचा शिखरबिंदू; संसारत्याग मोठी साधना- मंगलप्रभात लोढा

जैन दीक्षा म्हणजे धैर्याचा शिखरबिंदू; संसारत्याग मोठी साधना- मंगलप्रभात लोढा

६४ मुमुक्षूंनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली

marathinews24.com

पुणे – जैन शासनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल असा अविस्मरणीय क्षण ‘संयमरंग उत्सवा’दरम्यान अनुभवायला मिळाला. तब्बल ६४ मुमुक्षूंनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली. सुमारे २५ हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य दीक्षा सोहळ्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारावून गेला.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड – सविस्तर बातमी 

हा महोत्सव शांतिचंद्रसूरी समुदायाचे गच्छाधिपती आचार्य सोमसुंदरसूरीजी, आचार्य योगतिलकसूरीजी, आचार्य कुशलचंद्रसूरीजी आणि आचार्य पुण्यसुंदरसूरीजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला. आचार्य भगवंतांच्या आशीर्वादाने दीक्षार्थींनी संयम, त्याग आणि साधनेचे कठोर व्रत स्वीकारले.

‘रजोहरण’ अर्पण विधीच्या वेळी संपूर्ण मैदान “जैनं जयति शासनम्” या घोषणांनी दुमदुमून गेले. दीक्षा विधीदरम्यान अनेक कुटुंबांसाठी तो अत्यंत भावनिक क्षण ठरला. विशेष आकर्षण ठरले अध्यात्म परिवाराशी संबंधित युवा कार्यकर्ते ऋषभभाई आणि त्यांची धर्मपत्नी सोनलबेन यांचा दृढ संकल्प. दोघांनीही तरुण वयात संसाराचा त्याग करून आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारत उपस्थितांना प्रेरणेचा संदेश दिला.

या प्रसंगी महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित राहून दीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांना अभिवादन केले. जैन समाजातील विविध ट्रस्टचे मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांनी सोहळ्यास उपस्थिती लावली होती.असाच भव्य दिव्य ६४ संयमींची ‘वडी दीक्षा’ सोहळा येत्या ७ मार्च रोजी मुंबईतील बोरिवली येथे श्री शांतिचंद्र शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य उत्सवात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×