जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे – उदयराज साने

जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे - उदयराज साने

पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

marathinews24.c0m

पुणे – ज्योतिष क्षेत्रात पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा या विषयातील व्यासंग मोठा होता. ज्योतिष शास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जकातदार कुटुंबियांनी संस्थेचे वटवृक्षात रुपांतर केले आहे, असे गौरवोद्गार ज्योतिष अभ्यासक उदयराज साने काढले.

वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल-पुष्कराज पाठक – सविस्तर बातमी 

बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ व फल ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे कै. पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) झाले. त्यावेळी साने बोलत होते.

साने यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर प्रिया मालवणकर यांचा कार्यगौरव, कै. सुरेश शहासने स्मृती पुरस्काराने सदाशिव शाळीग्राम यांचा तसेच आदिशक्ती ज्योर्तिविद्यालय या ज्योतिष संस्थेचाही या प्रसंगी गौरव करण्यात आला. भांडारकर रोडवरील बृहन्‌‍ महाराष्ट्र ज्योतिष मंडळ कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी होते. बृहन्‌‍ महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार, फल ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विजय जकातदार, युवा सेनेचे सचिव किरण साळी, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे मंचावर होते.

ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, ज्योतिष हे एक शास्त्र आहे. अभ्यास केल्याशिवाय या शास्त्रात पारंगत होता येत नाही. पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या कार्याचे स्मरण करून या पुरस्कारांचे वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे. ज्योतिष शास्त्रातून सकारात्मक उर्जा, मार्गदर्शन, भविष्यातील घटनांचा अंदाज मिळाल्यास खंबिर मानसिकता निर्माण होण्यास मदत होते.

प्रिया मालवणकर म्हणाल्या, विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार आणि मालती शर्मा यांचा माझ्या ज्योतिषविषयक कार्यात यशप्राप्ती करण्यात मोलाचा वाटा आहे. उदयराज साने यांच्या सारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वाच्या मार्गदर्शनाने या क्षेत्रात कार्यरत आहे. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. तसेच सदाशिव शाळीग्राम म्हणाले, कृष्णमूर्ती पद्धतीसाठी गुरूंच्या नावे दिलेला पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. आदिशक्ती ज्योर्ति विद्यालयाच्या संस्थापिका शिल्पा अग्निहोत्री म्हणाल्या, संस्थेमार्फत अनेक विद्यार्थी घडवत गेले. माझ्या शिष्यांनी माझ्यातील शिक्षक जागृत ठेवला आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांचा देखील आहे. प्रास्ताविक नंदकिशोर जकातदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मालती शर्मा यांनी तर मानपत्राचे वाचन विजय जकातदार यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×