चार अल्पवयीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर शस्त्राने वार करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना ४ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरातील निलगिरी चौकात घडली आहे. याप्रकरणी चार अल्पवयीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८ रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्याचे नाव आहे.
तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन जाधव हा कुटूंबियासोबत आंबेगाव पठार परिसरात राहायला होता. दोन दिवसांपुर्वी त्याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून अल्पवयीन आरोपींनी ४ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास नयनला निलगिरी चौकात गाठले. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. त्यामुळे नयन गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैâलास कोडम तपास करीत आहेत.























