Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली – संदीप खरे

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली - संदीप खरे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे संदीप खरे यांचा प्रेमकवी पुरस्काराने गौरव

marathinews24.com

पुणे – प्रेम कवितांचा वेध घेत असताना आयुष्याच्या वाटचालीत प्रेमाची अनेक रूपे दिसली ती कवितांमधून मांडत गेलो. अनेक प्रवाह माझ्या कवितेत मिसळत गेले. अवखळ वयातच कविता सुचते असे नाही. प्रेमावरील कविता लिहायला वयाचे बंधन नसते, असे मत प्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांनी व्यक्त केले. खरे यांनी ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या मळ्यात’, ‘आपण काय करणार’ या स्वरचित कविता ऐकवून रसिकांना प्रेम दिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड – सविस्तर बातमी 

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रसिद्ध संदीप खरे यांचा आज (दि. १४) प्रेमकवी पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्कराचे वितरण ज्येष्ठ कवयित्री हेमा लेले यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कवी, व्याख्याते डॉ. आशुतोष जावडेकर याची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

संदीप खरे यांच्या कवितांची समीक्षात्मक चिकित्सा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. आशुतोष जावडेकर म्हणाले, कवितेला सशक्त परंपरा आहे. कवितेचे धागे संतसाहित्यातही दिसतात. लयबद्धता, नादब्रह्मता हे संदीप खरे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेपासून दूर गेलेल्या युवा पिढीला काव्याच्या माध्यमातून मराठी भाषेची गोडी लावली असून भाषेविषयची असलेली मरगळ दूर सारली आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना हेमा लेले म्हणाल्या, कविता केवळ कागदावर उमटून चालत नाही तर कविता खऱ्या अर्थाने जगायची असते. साहित्यातील सर्वोच्च गोष्ट म्हणजे कविता होय. आयुष्य जगत असताना तन मनाने आयुष्याचा धागा विणत गेल्यास आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.

प्रास्ताविकपर स्वागत ॲड. प्रमोद आडकर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ‘प्रेम’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवप्रिया सुर्वे, डॉ. ज्योती रहाळकर, निरुपमा महाजन, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, वि. दा. पिंगळे, विजय सातपुते, वैजयंती आपटे, सुजित कदम यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×