अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक
marathinews24.com
पिंपरी चिंचवड – हिंजवडीत पोलिस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांच्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. ७ ऑगस्टला आमदार शंकर मांडेकर अतिक्रमणाबाबत चर्चा करीत असताना त्यांच्या समक्ष हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चर्चेमध्ये खंड पाडला. काही शेतकरी बांधवांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे म्हणाले की हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केलेली अरेरावी, शिवराळ भाषा अशोभनीय आहे. सरकारचा आणि पी एम आर डी चा जो चाललेला अनागोंदी कारभार शेकऱ्यांना मारणारा आणि हिंजवडी मान, मारुंजी रोड येथील बिल्डर लॉबीला तारणारा आहे. शेकऱ्यांना विश्वासात घेवून सरकारने भविष्यातील निर्णय घ्यावा. नुकतीच आम्ही पिंपरीची चिंचवडचे पोलिस आयुक्त यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास छावा संघटनेचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश अध्यक्ष व शेतकरी नेते व विजय घाडगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, मग्रूर, मदमस्तवाल पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांच्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करण्यात यावी. शांतपणे चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चर्चेत सहभागी होण्यासाठी बोलवले असता त्यांनी त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत आणि शिवराळ भाषा वापरली.
संबंधीत घटनेतील दोषींवर कारवाई न झालेस अखिल भारतीय छावा संघटने मार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणेत येईल. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचे मनोज आण्णा मोरे, मच्छिंद्र चिंचोळे, अक्षय बोडके, प्रशांत फड, सचिन लिमकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.





















