Breking News
डी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल

सुग्रीव धपाटेंची नियुक्ती; कारवाई अहवालाला वेग येणार

marathinews24.com

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर आधारित क्शन टेकन रिपोर्ट’ (एटीआर) तयार करणाऱ्या समितीच्या रचनेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. समितीतील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती केली आहे. या बदलामुळे एटीआर प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती – सविस्तर बातमी  

उच्चस्तरीय समितीची जबाबदारी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत प्रधान सचिव तसेच अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे. अहवालातील गंभीर निरीक्षणे, त्रुटी आणि जबाबदार्या निश्चित करून दोषींवर कोणती कारवाई करावी, याबाबत स्पष्ट शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

ताहलियानी समितीने सुचवलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी करणे, भविष्यात अशा
कोणत्याही तक्रारी, घटना किंवा चौकशी अहवालानंतर प्रशासन, पोलीस किंवा संबंधित विभागाने प्रत्यक्षात कोणती व कशी कार्यवाही केली, याची सविस्तर व अधिकृत नोंद एटीआरमध्ये दिली जाते.या अहवालात दोषींवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, कोणते सुधारात्मक उपाय राबवण्यात आले तसेच पुढे कोणते पावले उचलण्यात येणार आहेत, याचा तपशील नमूद केला जातो. पारदर्शकता वाढवणे, जबाबदारी निश्चित करणे आणि संबंधित समस्या खरोखरच निकाली निघाली आहे की नाही, याची खात्री करून देणे हाच एटीआरचा मुख्य उद्देश असतो.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×